…तर अशा माणसानं मुख्यमंत्रीपदी कशाला बसायचं?; सुषमा अंधारेंचा खोचक सवाल
मुंबई : वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर ‘टाटा एअरबस’ प्रकल्पही गुजरातला गेला आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टाटा एअरबस’ हा महाराष्ट्राबाहेर जाणारा सातवा प्रकल्प आहे. ठरवून महाराष्ट्राचं अर्थकारण खिळखिळं केलं जात आहे. महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. मला वाईट याचं वाटतं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काहीही ठोस उपाय-योजना करत नाहीत., असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या टी.व्ही.9 मराठीशी बोलत होत्या.
हे ही वाचा : शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर रवी राणा बॅकफूटवर; वाद मिटला ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर सातत्याने नवरात्रीची आरती करणे, गणपतीची आरती करणे, पितृपक्षाचं जेवण करणे, यालाच जर आपल्या कर्तव्याची चौकट मानत असतील, तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला असावं? सगळेच उद्योग जर तुम्ही गुजरातला देत असाल, तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा प्रभारी बनवा. किमान यामुळे तरी ते महाराष्ट्राकडे व्यवस्थित लक्ष देतील, असा टोला सुषमा अंधारेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांना यावेळी लगावला.
0 Response to "…तर अशा माणसानं मुख्यमंत्रीपदी कशाला बसायचं?; सुषमा अंधारेंचा खोचक सवाल"
टिप्पणी पोस्ट करा